शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

शिवसेनेच्या वर्चस्वाला राष्ट्रवादी चे आव्हान ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:01 IST

प्रकाश वराडकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते व सेनेचे राज्यातील पर्यावरणमंत्री रामदास कदम आपल्यामधील दुरावा संपल्याचे सांगत भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत धक्का देण्यास सज्ज झाले आहेत, तर चिपळूण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेण्याची जोरदार तयारी राष्टÑवादीचे शेखर निकम यांनी केली असून, त्यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्षपदावर पाणी ...

प्रकाश वराडकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते व सेनेचे राज्यातील पर्यावरणमंत्री रामदास कदम आपल्यामधील दुरावा संपल्याचे सांगत भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत धक्का देण्यास सज्ज झाले आहेत, तर चिपळूण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेण्याची जोरदार तयारी राष्टÑवादीचे शेखर निकम यांनी केली असून, त्यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्षपदावर पाणी सोडले आहे. सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम जिल्ह्यात आतापासूनच घुमू लागले आहेत. जिल्ह्यावरील सेनेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी राष्टÑवादीने सुरू केल्याची चर्चा आहे.जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रत्नागिरी, लांजा-राजापूर व चिपळूण अशा तीन जागांवर विजय मिळाला होता. दापोली व गुहागर या दोन्ही मतदारसंघांवर राष्टÑवादी कॉँग्रेसने कब्जा केला होता. दापोलीची जागा सेनानेते अनंत गीते व रामदास कदम यांच्यातील राजकीय हेवे-दाव्यांमुळे सेनेच्या हातून गेल्यावेळी निसटली. तेथे राष्टÑवादीचे संजय कदम यांनी बाजी मारली. रत्नागिरीत सेनेचे उदय सामंत , चिपळूणमध्ये सदानंद चव्हाण व राजापूरमध्ये राजन साळवी यांनी सेनेचे गड त्यावेळी राखले.विधानसभा निवडणुकीला एक वर्ष उरले असून, सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात पुन्हा सेनेच्या विजयासाठी एकमेकांचे विरोधक असलेले गीते-रामदास कदम एकत्र आले आहेत. उत्तर रत्नागिरीत त्यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. दक्षिण रत्नागिरीतील चार तालुक्यांमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रत्नागिरी व लांजा - राजापूर हे मतदारसंघ राखण्यासाठी शिवसेनेने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाचे आधी समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी राजापूरची विधानसभा जागा धोक्यात येईल, हे लक्षात आल्याने यु टर्न घेतला आहे. नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प लादल्यास उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. मात्र, हा यु टर्न केवळ निवडणुकीपुरता मर्यादित कालावधीसाठी असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.दुसरीकडे गुहागर व दापोली हे मतदारसंघ राखण्याबरोबरच चिपळूण मतदारसंघही ताब्यात घेण्याचा चंग राष्टÑवादी कॉँग्रेसने बांधला आहे. रत्नागिरीत आमदार उदय सामंत यांनी मतदारसंघात सेनेची वीण घट्ट बांधली आहे. तरीही येथे भाजपकडून प्रसाद लाड किंवा अन्य तगडा उमेदवार दिला जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे एकूणच निवडणुकीचे राजकारण रंगले आहे.भाजपच्या रणनीतीवर लक्षजिल्ह्यात भाजप कमकुवत असला तरी राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजप नेमकी कोणती रणनीती आखणार, याकडे सर्व पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. एकूणच २०१९ची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.